केंद्र सरकारकडून दुजाभाव : गुजरातला ३० लाख, तर महाराष्ट्राला केवळ साडेसात लाख लस पुरवठा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना निर्मूलनासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवत आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याची बाब आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उघड केली आहे. केंद्र सरकार कोरोना लस वितरीत करताना महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचे राजेश टोपे यांनी आकडेवारीसह समोर आणले आहे. राज्याला आतापर्यंत केवळ साडेसात लाख लसी मिळालेल्या असतानाच उत्तर प्रदेशला ४८ लाख, हरियाणाला २४ लाख आणि गुजरातला ३० लाख लसी देण्यात आल्या आहेत.  

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला लस पुरवण्याबाबत होत असलेला दुजाभाव समोर आणला. याबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले, राज्याची लोकसंख्या १२ कोटी एवढी आहे. तर सध्या राज्यात आतापर्यंत ३० लाख जणांना कोरोनाची लागण झाली असून सध्या साडेचार लाख सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत ५७ हजार जणांचे मृत्यू झाले आहेत. असे असताना महाराष्ट्राला फक्त साडेसात लाख लसी देण्यात आल्या आहेत.

महिन्याला १ कोटी ६० लाख लसीची आवश्यकता

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना आपण ही बाब दाखवून दिली असून त्यांनी राज्याला लस कमी पडू न देण्याचे आणि याबाबत प्रशासनाला सूचना देत असल्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगून टोपे म्हणाले,  वास्तवात महाराष्ट्राला सात दिवसांना  किमान ४० लाख याप्रमाणे महिन्याला १ कोटी ६० लाख लसी मिळणे आवश्यक आहे.  तरच महाराष्ट्रात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे.  

सातारा, सांगली, पनवेल येथील लसीकरण थांबले

दरम्यान, लस उपलब्ध होत नसल्यामुळे सातारा, सांगली आणि पनवेल येथील लसीकरण बंद करण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी लस नसल्यामुळे लसीकरण थांबवण्याची नामुष्की ओढवल्याचेही टोपे यांनी सांगितले. केंद्र सरकारने लस पुरवठ्याबाबत दुजाभाव न करता तात्काळ महाराष्ट्राला लस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.   


ह्याचा प्रसार करा
baramati_adm

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago