

मुंबई : प्रतिनिधी
देशातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आरोग्य विभागाने याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात लवकरच पुन्हा काही निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा मास्क सक्ती करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
देशातील विविध भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कोरोनाचे संभाव्य संकट लक्षात घेऊन गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्याचा राज्य शासनाचा विचार सुरू असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासह अन्य काही उपाययोजना हाती घेतल्या जातील असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येमागे सातजण बाधित आढळत आहेत. ओमीक्रॉन या विषाणूचा कोणताही प्रकार महाराष्ट्रात आढळलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात ६ ते १२ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. याबाबत शाळा प्रशासन आणि पालकांना विश्वासात घेऊन पुढील प्रक्रिया राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…