

मुंबई : प्रतिनिधी
कर्नाटकमधील हिजाब प्रकरण चांगलेच तापले आहे. ठिकठिकाणी या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे. या वादावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. समाजात फूट पाडणाऱ्या घटना टाळायला पाहिजेत. कारण त्याचा काही लोक राजकीय उद्देशाने फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जात आणि धर्मात फूट पाडायला आपली भारतीय संस्कृती आणि संविधान शिकवत नाही, असे ते म्हणाले,
आज जग पुढे जात आहे. देश प्रगत होत आहे. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी आहे.अशावेळी या तरुणांचा वापर करून विकासासाठी वापर करता येईल, याचा विचार केला पाहिजे असेही अजित पवार यांनी नमूद केले. अशावेळी एखादी व्हिडिओ क्लिप वायरल केली जाते. मग त्यावर कोणीतरी ट्विट करते. त्यावर काऊंटर ट्विट पडतात आणि मग त्यातून निष्कारण नको त्या विषयाला महत्त्व दिले जाते. याबाबत सगळ्यांनी संयमी भूमिका ठेवून वागले पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…