

मुंबई : प्रतिनिधी
वसईतील आदिवासी महिलांना चोर समजून मारहाण करणाऱ्या पोलिसांचं तात्काळ निलंबन करावं आणि संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं चालतंय हे महाविकास आघाडी सरकारने दाखवून द्यावं, अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.
वसईच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना पोलिसांनी चोर समजून मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या पोलिसांवर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. तर महिलांना कोणतीही मारहाण केली नसून केवळ समज देण्यासाठी आम्ही त्यांना ताब्यात घेतलं होतं, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. या प्रकरणी आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे.
घटनेला दोन दिवस उलटून गेले असून या प्रकरणी अजूनही पोलिसांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दुसरीकडे मारहाण झालेल्या महिलांना अजूनही न्याय मिळाला नसल्याने या महिलांनी आदिवासी संघटनांना मदत मागितली आहे.
दरम्यान, संबंधित महिलांना मारहाण केली नसल्याचा दावा पोलिसांनी केला असुन या प्रकरणाच्या वरिष्ठ स्तरावरुन चौकशीनंतरच कारवाई केली जाईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…