

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडला असून पहिल्या टप्प्यात शिंदे गटाच्या आणि भाजपच्या प्रत्येकी नऊ अशा १८ मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या संजय राठोड यांनीही शपथ घेतली आहे. संजय राठोडांच्या शपथविधीवर भाजपच्या चित्रा वाघ यांनी टीका करत पूजा चव्हाण प्रकरणातील माझा त्यांच्याविरूद्धचा लढा चालूच राहील असं ट्विट केलं आहे.
‘पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे, जितेंगे’ असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
दरम्यान, संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विविध आरोप करण्यात आले आहेत. पूजा चव्हाण हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांना परत मंत्रिपद मिळालं आहे. पण त्यांच्याविरूद्धचा लढा अजूनही कायम राहील असा पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…