शेतकऱ्यांना चिरडण्याचा जालियनवालाबाग हत्याकांडासारखा प्रकार : शरद पवार

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

उत्तरप्रदेशातील लखिमपुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या हिंसाचारात झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार उत्तरप्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे. लखीमपुर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराचा प्रकार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. 

शेतकरी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारवर कडाडून टिका केली. एक वर्षापासून शेतकरी शांतपणे आंदोलन करत आहेत. लोकशाहीमध्ये शांतपणे आंदोलन करण्याचा हक्क आहे. तो हक्क वापरत लखिमपुरमध्ये शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारची भागीदारी असलेल्या परिवारातील काही लोकांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात गाडी घालून त्यांना चिरडले. त्यात काही  शेतकऱ्यांची मृत्यू झाला. या घटनेची  सगळी जबाबदारी केंद्रातील भाजप सरकारची आणि उत्तर प्रदेश सरकारची आहे असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. 

शांतीपूर्वक आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर हल्ला करणाऱ्या केंद्र सरकारची नीतिमत्ता दिसून येत असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून सत्तेचा वापर शेतकऱ्यांना दाबण्यासाठी होणारा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही विरोधक शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. त्यांच्या मागणीसाठी आम्ही लढा देवू असेही त्यांनी सांगितले. 

ज्याप्रकारे उत्तर प्रदेश सरकार वागणूक देत आहे. ती वागणूक लोकशाहीची हत्याच आहे. हे सरकारच मुळात असंवेदनशील आहे. सरकारच्या या वागणुकीला सामान्य शेतकरीच उत्तर देतील, असेही शरद पवार यांनी नमूद केले. 


ह्याचा प्रसार करा
baramati_adm

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago