मुंबई वगळता नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्क्यांनी होणार वाढ : राज्य सरकारचा मोठा निर्णय

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारने वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शहरातील विकासाचा दर झपाट्याने वाढवण्यासाठी मुंबई वगळता राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि महानगरपालिकांच्या नगरसेवकांच्या संख्येमध्ये १७ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सध्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची सदस्य संख्या किमान ६५ तर कमाल १६५ इतकी आहे. नगरपरिषदेमध्ये नगरसेवकांची सदस्य संख्या किमान १७ आणि कमाल ६५ आहे. मात्र मोठ्या शहरांप्रमाणेच छोट्या शहरांमध्येही विकासाचा दर झपाट्याने वाढवण्याची आवश्यकता असल्याचे राज्य सरकारचे मत आहे. त्यासाठी मुंबई शहर वगळता राज्यातील इतर सर्व नगरपरिषदा आणि महानगरपालिकेमध्ये एकूण सदस्यसंख्येच्या १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्य सरकारचे मत आहे. 

या निर्णय घेण्याअगोदरची  नगरसेवकांची किमान आणि कमाल संख्या २०११ च्या जनगणनेनुसार  निर्धारीत करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप कोरोनाच्या संकटामुळे २०२१ च्या जनगणनेचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची सरासरी लक्षात घेऊन आणि शहरांचा झपाट्याने विकास करण्यासाठी नगरसेवकांच्या संख्येमध्ये १७ टक्के वाढ करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

शासनाच्या नवीन निर्णयानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या १११ वरून १२२ होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत १२२ वरून १३३, नागपूर महानगरपालिकेत १५१ वरून १५६ , पुणे महानगरपालिकेत १६५ वरून १७३, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत १२८ वरून १३९, ठाणे महानगरपालिकेत १३१ वरून १४२ नगरसेवक होणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
baramati_adm

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago