महाविकास आघाडी सरकार शेतकरी हित जोपासण्यासाठी कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार

ह्याचा प्रसार करा

नाशिक : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले, त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन देऊन शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचाच वारसा घेऊन शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा व त्यांची फसवणूक होणार नाही यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.  महाविकास आघाडी सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी असून त्यांना न्याय देण्यासाठी सदैव कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आज देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार सरोज अहिरे, दिलीप काका बनकर, नितीन पवार, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, सय्यद पिंपरी गावचे सरपंच मधुकर ढिकले यांच्यासह उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल ढिकले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकास कामांसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास जलद गतीने विकास होण्यास मदत होईल. याकरिता सर्वांनी जातीने लक्ष दिल्यास कामाची गुणवत्ता टीकून राहण्यास मदत होईल. आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या जिद्द व चिकाटीने आपल्या विधानसभा मतदारसंघात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन देवळाली विधानसभा मतदारसंघ येथील प्रस्तावित असलेल्या 15 कोटींच्या क्रीडा संकुलाच्या कामासाठी 5 कोटी निधी त्वरीत उपलब्ध करून देण्यात येणार असून, क्रीडा संकुलाचे काम सुरु झाल्यानंतर उर्वरीत निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

आरोग्य विभागात कोरोना काळात निधीची कमतरता पडू नये यासाठी अधिवेशनात 300 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून अन्न व नागरी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग या विभागांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. त्याचप्रमाणे देशात सर्वात जास्त लसीकरण राज्यात झाले आहे. यापुढेही जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी हाफकीन या संस्थेला लस निर्मितीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी कोरोना काळात रुग्णांची अथक सेवा करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी व डॉक्टरांना डॉक्टर दिना निमित्त शुभेच्छा देऊन, सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व तिसऱ्या लाटेत स्वत:सोबत आपल्या कुटुंबाची व बालकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

जगभरात शेतमालाची निर्यात करणारा भारत महत्त्वपूर्ण देश : छगन भुजबळ

स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी खेड्यापाड्यात जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देऊन कृषि क्रांती घडविली आहे. त्यामुळे आज आपला देश जगभरात शेतमालाची निर्यात करणारा महत्त्वपूर्ण देश बनला आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा वारसा पुढे सुरु ठेवून जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी भरीव योगदान देणे महत्त्वाचे आहे. तसेच जिल्ह्यात अतिशय सुंदर क्रीडा संकुल उभे राहत असून यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
baramati_adm

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago