

मुंबई : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील लखिमपुर जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राज्य सरकारने आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. या बंदला बेकायदेशीर म्हणत मुंबईतील एका वकिलाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र पाठवले आहे. या बंदची सुमोटो दखल घ्यावी असे त्या वकिलांनी म्हटले आहे.
मुंबईतील एका वकिलाने उच्च न्यायालयातील न्यायाधीश यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आजचा बंद हा बेकायदेशीर आहे. हा बंद अभिव्यक्ती स्वातंत्र्यात आडवा येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या बंदची उच्च न्यायालयाने सुमोटो दखल घ्यावी, अशी विनंती त्या वकिलाने पत्रात केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने घोषित केलेल्या बंद वर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी या वकिलाने केली आहे.
महाराष्ट्रातील लोक आत्ताच लॉकडाऊनमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे बंद त्यांना त्रासदायक ठरू शकतात. राज्य सरकारने पुकारलेला हा बंद, अप्रत्यक्षपणे सत्ताधारी पक्षाने पुकारला आहे, असे समजले जाऊ शकते. असेही त्या वकिलाने या पत्रात म्हटले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…