

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी संप चालू आहे. त्यामुळे या संपावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष समिती नेमली जाणार आहे. राज्य सरकारकडून नेमण्यात येणाऱ्या या समितीची रूपरेषा सोमवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका एसटी कर्मचारी संघटनेने घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप सुरु केला आहे. त्यामुळे आज राज्यातील तब्बल ७२ आगारांचे काम बंद होते. बंद असलेल्या कामामुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी संप चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचारी आणि महामंडळामध्ये यांच्यामध्ये चर्चा करण्यासाठी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडून वरिष्ठ स्तरावरील सचिवांची एक विशेष समिती नेमण्यासाठी तयारी दर्शवली आहे.
समितीचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतलेला आहे. त्यामुळे सोमवारी उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीनंतरच संघटनेची भूमिका स्पष्ट होईल.
शासनाच्या ढिसाळ कामामुळे तब्बल ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, असे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठाने दखल घेतली असून सोमवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये महाधीवक्त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…