

मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यास भाग पाडून त्यांना तिकीट देऊन तिथे जाऊन कोरोना पसरवण्यास सांगितले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडत आहोत. त्यामुळे मी त्यांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने पाहत होते. त्यांनी केलेल्या महाराष्ट्रबद्दल वक्तव्याचा मला खूप वेदना झाल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील या वक्तव्यामुळे वाईट वाटले. राज्याने भाजपला १८ खासदार निवडून दिले आहेत. त्यांचा पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचा मोलाचा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा असा अपमान करणे हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या.
नरेंद्र मोदी हे भाजपचे नसून देशाचे पंतप्रधान आहे. ते एका पक्षाच्या वतीने बोलताना पाहून मला खूप वाईट दु:ख झाले. इतर राज्यांच्या तुलनेने सगळ्यात जास्त रेल्वे गुजरात राज्यात गेल्या. केंद्र सरकार या रेल्वे चालवते. आम्ही रेल्वे नाही एसटी बस देऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या या भाषणामुळे मला खूप वेदना होत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…