

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला दिला आहे. त्याचवेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनीही पवारांच्या वक्तव्याचं समर्थन करत भाजपवर हल्ला चढवला आहे.
आमच्या लोकांवर खोटे आरोप करुन आणि खोट्या पुराव्याच्या आधारे तुरुंगात पाठवले जाते किंवा केंद्रीय एजन्सीकडून त्यांचा छळ केला जातो. आम्ही त्यापैकी एक होतो. पण आम्ही घाबरणार नाही अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त फरार झाले आहेत. ते आरोप सिद्ध करण्यासाठी ते स्वत: पुढे येत नाहीत. भाजपने अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकले आहे. अशा स्थितीत भाजपने आता जे काही केले, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असे विधान शरद पवार यांनी केले होते.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…