

मुंबई : प्रतिनिधी
भाजप उडवत असलेल्या नकली रंगांवर केंद्राने बंदी घातली आहे. त्याचबरोबर या रंगांप्रमाणे त्यांच्या आरोपांमध्ये भेसळ असल्याची खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रावर निशाणा साधताना केली आहे. होळीचा सण वर्षातून एकदाच येतो परंतु भाजपचा दररोज शिमगा सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
महाराष्ट्रातदेखील खड्डे खणायला सुरुवात केली, तर त्यात कोण कोण पडेल ते बघितलं जाईल. भाजपला पाठीमागून वार करण्याची सवय आहे. फडणवीस गोव्यात जिंकले आहेत, परंतु गोवा काय आहे त्यांना आता लवकरच समजेल. पोर्तुगाल आणि इंग्रजांना गोवा समजला नव्हता फडणवीसांना काय समजणार, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
भाजप भेसळयुक्त रंग वापरत असून केंद्राने या रंगावर बंदी घातली आहे. आम्ही कधीच राजकिय धुळवड साजरी केली नाही. सध्या राज्यात दररोज धुळवड साजरी केली जात आहे. भाजपला शिमगा आणि होळीमधला फरक समजला नाही. त्यांनी नीट अर्थ समजून घ्यावा. स्वाभिमान, अखंडता आणि एकता हे महाराष्ट्राचे रंग असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…