केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या भितीला महाविकास आघाडी सरकार घाबरत नाही : शरद पवार

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मागील दोन वर्षात भाजपाचे महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न फसले आहेत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे आणि भीती दाखवण्याचे काम चालू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. या भितीला आम्ही घाबरत नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

बुधवारी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर होऊ शकत नाही. हे सरकार त्यांना पडू शकत नाही. हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. त्यामुळेच भाजपा सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग, प्राप्तिकर विभाग यांसारख्या केंद्र यंत्रणेचा वापर करून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर चौकशीचे ससेमिरा मागे लागत आहे. अजित पवार यांच्या तीन बहिणींवर प्राप्तीकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. मात्र आम्ही अशा कारवायांना घाबरत नाही, असेही शरद पवार यांनी नमूद केले.

केंद्रातील भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. मात्र आम्ही त्यांना डगमगत नाहीत. फक्त मंत्र्यांना काळजी घेण्याचे सांगितले आहे, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पवार यांनी फडणवीस यांच्या ‘आजही मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो. मात्र मला कधीच मुख्यमंत्रीपदाची आठवण होत नाही. त्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. मात्र त्यांना विस्मरण होत नसेल. 

देवेंद्र फडणवीस यांनी मावळ गोळीबारावर पवार यांच्यावर टीका केली होती. मावळमधील गोळीबार पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेत केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाकडून शेतकर्‍यांच्या अंगावर गाड्या घालण्यात आल्याचा आरोप आहे व त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली असल्याचे सांगून पवार यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


ह्याचा प्रसार करा
baramati_adm

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago