

अहमदनगर : प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे कारचा उसाच्या ट्रेलरला धडकून भीषण अपघात झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातामध्ये कारमधून प्रवास करणारे तिघे मित्र मृत्यूमुखी पडले. स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य केले, मात्र त्यांना यश आले नाही.
राहुल सुरेश आळेकर (वय २२), केशव सायकर (वय २२) आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय १८) असे अपघातात मृत्यू झालेल्या तिघा मित्रांची नावे आहेत. कारमधून प्रवास करत राहुल आणि आकाश हे केशव सायकरला काष्टीला घरी सोडवण्यासाठी चालले होते. काष्टी रस्त्यावर उसाच्या ट्रेलरला त्यांच्या कारची भीषण धडक झाली. या धडकेत त्यांना आपला जीव गमवावा लागला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. अपघातग्रस्त युवकांना कारमधून बाहेर काढले. आकाश खेतमाळीस आणि केशव सायकर या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. राहुल आळेकर हा गंभीर जखमी झाला होता. नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. मात्र त्याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.एकाच वेळी तीन मित्रांच्या अपघाती मृत्यूमुळे काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…