

अक्कलकोट : प्रतिनिधी
अहमदनगरहुन कर्नाटकातील गाणगापूर येथे श्री दत्ताच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने झडप घातली आहे. गाणगापूरहून देवदर्शनकरून पुन्हा मागे परतीचा प्रवास करत होते. अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर गाडीचा टायर फुटून गाडी रस्त्याकडेच्या झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना अफझलपुर शासकीय रुग्णालयात हलवले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदनगरचे कुटुंब श्री दत्ताचे दर्शन घेऊन परतत असताना अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर अफजलपुर तालुक्यातील बळरोगी गावात भाविकांच्या कारचा पुढचा टायर फुटला. टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लिंबाच्या झाडावर कार आदळली. यामध्ये गाडीची समोरची बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली. त्यामुळे एकाच कुटुंबातील चार व्यक्तीसह कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील ४ महिलांचा समावेश आहे. एमएच १६ बीएच ५३९२ असा कारचा नंबर आहे. डॅटसन गो प्लस या कारमधून हे सर्वजण प्रवास करत होते. परंतु कारचा भीषण अपघात झाल्याने पाच व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी अफझलपुर पोलिसांनी पंचनामा केला आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…