

सातारा : प्रतिनिधी
राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सगळ्यांना न्याय मिळाला आहे. राज्याचे अर्थचक्र सध्या सुरळीत पार पडत असल्याचे वक्तव्य गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून टीका करत आहेत. त्यांना टीका करायची असेल तर खुशाल करु द्या. शिवसेना पक्ष येत्या काही काळात राज्याबाहेर पसरलेला दिसेल. भारत देशामध्ये महाराष्ट्राला एक नंबर बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आणि आपण विधानपरिषदेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. सर्व घटकांचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याच घटकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली गेल्याचे सांगून शंभुराज देसाई म्हणाले, विरोधकांना टीका करणे एवढंच काम उरलं आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही सरकार म्हणून सामान्य घटकांवरच लक्ष केंद्रीत केलं आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील जनतेच्या निकालाचा आम्ही स्वीकार केला आहे. राज्याबाहेर शिवसेना पक्षचा वाढीसाठी आम्ही सुरुवात केली असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले विचारांचा आम्हाला विसर पडला नाही असेदेखील ते म्हणाले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…