अर्थकारण

अर्थसंकल्पातून सगळ्यांना न्याय मिळाला; शंभूराज देसाई यांचे वक्तव्य

ह्याचा प्रसार करा

सातारा : प्रतिनिधी  

राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सगळ्यांना न्याय मिळाला आहे. राज्याचे अर्थचक्र सध्या सुरळीत पार पडत असल्याचे वक्तव्य गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून टीका करत आहेत. त्यांना टीका करायची असेल तर खुशाल करु द्या. शिवसेना पक्ष येत्या काही काळात राज्याबाहेर पसरलेला दिसेल. भारत देशामध्ये महाराष्ट्राला एक नंबर बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आणि आपण विधानपरिषदेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. सर्व घटकांचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याच घटकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली गेल्याचे सांगून शंभुराज देसाई म्हणाले, विरोधकांना टीका करणे एवढंच काम उरलं आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही सरकार म्हणून सामान्य घटकांवरच लक्ष केंद्रीत केलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील जनतेच्या निकालाचा आम्ही स्वीकार केला आहे. राज्याबाहेर शिवसेना पक्षचा वाढीसाठी आम्ही सुरुवात केली असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले विचारांचा आम्हाला विसर पडला नाही असेदेखील ते म्हणाले.


ह्याचा प्रसार करा
आपली बारामती न्यूज

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago