

पुणे : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळातील ग्रामीण आमदारांसाठी ३०० घरे निर्माण करणार असल्याची मोठी घोषणा विधानसभेत केली होती. त्यानंतर काही आमदारांनी या निर्णयाचा विरोध केला. तसेच राज्य सरकारच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही आमदारांना फुकट घर मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी या निर्णयावर स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी काल आमदारांना हक्काची सदनिका मिळणार असल्याचे जाहीर केले. मात्र आमदारांना फुकटच घरे मिळणार असल्याचे सगळ्यांना वाटत आहे. ती घरे सगळ्यांना मिळणार नाहीत. त्या घरांची काही किंमत मोजावी लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
मी आणि माझ्या पत्नीच्या नावे घर मिळणार नाही. राज्यात अशी काही आमदार आहेत की त्यांना जनतेच्या कामासाठी मुंबईत येऊन राहावे लागते. त्यांच्यासाठी घरे आहेत. मात्र कालपासून प्रसारमाध्यमांनी इतके ठोक ठोक ठोकले की ते घरे फ्लॅट असल्याचे वाटते. आपण गरीब आमदारांना घरे देण्याचा प्रयत्न करतोय, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…