

मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी, हा अर्थसंकल्प नव्हे ! निवडणूक संकल्प असे ट्विट करत निशाणा साधला आहे.
देशामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका चालू आहेत. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हा अर्थसंकल्प नाही. हा निवडणूक संकल्प आहे.
दोन वर्षापासून कोरोना जागतिक महामारीचे संकट असल्यामुळे या संकटातून सावरत देशासह जागतिक अर्थव्यवस्थेसमोर उभे राहण्याचे आव्हान केंद्र सरकारसमोर आहे. देशाला उभारी मिळण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले होते.
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…