

कराड : प्रतिनिधी
राज्यातील राजकारणात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असून प्रामुख्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. अशातच आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुढील काळात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असेल असा दावा केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून मागील काही दिवसांपासून चर्चा रंगत आहेत. अशातच काल बाजार समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने आणि महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर कराड दौऱ्यावर असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार ही बाब सगळ्यांनी मान्य केली आहे. येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…