

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यानुसार हे कायदे रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. या प्रस्तावाला या बैठकीत मंजूरी घेतली जाणार आहे. त्यानंतर संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये तीनही कृषी कायदे अधिकृतरित्या मागे घेतले जाणार आहेत.
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना देशभरातून विरोध होत होता. एवढेच नव्हेतर गेल्या वर्षभरापासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेत असल्याची मोठी घोषणा केली होती. त्यानुसार बुधवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे कायदे रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
मंत्रीमंडळाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात ठेवला जाईल. त्यानंतर हे तीनही कायदे अधिकृतरीत्या मागे घेतले जाणार आहेत. दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतरही दिल्लीत सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आलेले नाही. जोपर्यंत संसदेत हे कायदे मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…