

बारामती : प्रतिनिधी
केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं स्वागत करत राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी हा शेतकरी एकतेचा विजय असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. त्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनीही या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.
पार्थ पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच शेतकऱ्यांनी सामूहिकपणे केलेल्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेमुळे केंद्र सरकारला हे जाचक कायदे रद्द करावे लागल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांनी हे तीन कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु ठेवले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. देशभरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोर्चे काढून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…