

कोल्हापूर : प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या शुक्रवारपासून ग्रामीण भागात राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी दिली.
शेतीसाठी दिवसा १० तास वीज देण्यात यावी, वीज बिल वसुली थांबवावी, शेतकऱ्यांना दिलेली शेतीपंपाची चुकीची बिले तातडीने दुरुस्त करण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथील महावितरण कंपनीसमोर बेमुदत धरणे आंदोलन अद्याप सुरू आहे. त्यातच आता राजू शेट्टी यांनी नवीन आंदोलनाची घोषणा केली आहे.
येत्या काही दिवसांत सरकार आम्हाला चर्चेसाठी बोलावू शकतात. आम्हीही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी आज सकाळी मला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा फोन आला होता. परंतु जोपर्यंत यातून काही उपाय निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे. धरणे आंदोलन सुरु ठेवूनच आपण सरकारशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…