

मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्रीपद घेणार असल्याची चर्चा आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य करत मिश्किल टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्रीपद घेणार असल्याची बाब कानावर आली. नागपूर ही उपराजधानी सोडून ते पुण्यात येत आहेत. पुण्याचा सुपुत्र म्हणून त्यांचं स्वागतच आहे असा टोला अजितदादांनी लगावला आहे.
१७ ऑगस्टपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला. राज्यात अनेक प्रश्न असताना अद्याप खातेवाटप झालेलं नाही. सर्वजण बिनखात्याचे मंत्री आहेत. कदाचित दिल्लीतून सिग्नल आला नसेल असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला.
मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेत नाहीत. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपद घेण्याची प्रथा आपणच सुरू केली आहे. त्यामुळे आताचेही उपमुख्यमंत्री पालकमंत्रीपद घेतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्रीपद घेत असल्याचे कानावर आले आहे. मात्र नागपूरसारखी उपराजधानी सोडून ते पुण्यात येत आहेत. पुण्याचा सुपुत्र म्हणून त्यांचे स्वागतच आहे, असा टोलाही लगावला.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…