

मुंबई : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या वक्तव्यांसाठी आणि त्यातील टोलेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राष्ट्रीय राजकारणात तुम्हाला जावं असं वाटत नाही का असा प्रश्न अजित पवार यांना विचारला. त्यावर अजितदादांनी मी एकदा दिल्लीला जाऊन आलोय, पण तिथली सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मला महराष्ट्रच बरा वाटतो. त्यामुळं आता तिथली जबाबदारी माझ्या बहिणीवर दिल्याचं सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने बिहारमध्ये कोसळलेल्या पूलाविषयी प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी संबंधित कामाची चौकशी व्हायला हवी आणि दोषींवर कारवाई करावी असे मत व्यक्त केले. याबाबत आपल्याकडे अधिक काय अधिक माहिती आहे का असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी माझ्याकडे अधिकाची माहिती नाही, मी महाराष्ट्रातील प्रश्नांकडे लक्ष देतो. बाहेर लक्ष देत नाही असं स्पष्ट केलं.
या प्रश्नानंतर तुम्ही अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात आहात, तुम्हाला कधी दिल्लीच्या राजकारणात जावं असं वाटत नाही का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजितदादांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. अजित पवार म्हणाले, मी एकदा दिल्लीला जाऊन आलो आहे. १९९१ साली मला बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी जवळपास साडेतीन लाखांच्या मताधिक्याने लोकसभेत पाठवले होते. त्यावेळी मी दिल्लीतलं राजकारण पाहिल्यावर विचार केला की गड्या आपला महाराष्ट्रच बरा..!
तुम्हाला केंद्रीय मंत्री व्हावं असं वाटत नाही का या प्रश्नाला उत्तर देताना मला अजिबात तसं वाटत नाही. मी ती सगळी जबाबदारी माझ्या बहिणीवर टाकली आहे असं सांगत अजितदादांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…