

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना गोरेगाव पात्राचाळ घोटाळ्याप्रकरणी काल न्यायालयाने जामीन मंजूर केला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेने मला खूप काही दिले आहे; त्यामुळे शिवसेनेसाठी शंभर वेळा तुरुंगात जावे लागले तरी माझी तयारी आहे’ अशी भूमिका व्यक्त केली.
संजय राऊत म्हणाले, आम्ही सगळे कुटुंब असल्यामुळे मी तुरुंगात गेलो. मला माहिती होते मी तुरुंगात गेल्यानंतर उद्धव ठाकरे, वहिनी आणि आदित्य कुटुंबाची काळजी घेतील. या एका हिमतीवर मी तुरुंगात गेलो. त्यामुळे आमच्या मूळ शिवसेनेसाठी मला शंभर वेळा तुरुंगात जावे लागले, तरी माझी तयारी आहे. पक्षासाठी कधीतरी त्याग करण्याची वेळ येत असते. त्याग करण्याची माझी तयारी नसेल, तर पक्षाने माझ्यासाठी चाळीस वर्षात जे काही दिले आहे. त्यासाठी मी पक्षाशी कृतघ्नता ठरेल, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.
बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे यांच्याशी असलेले नाते हे टिकले पाहिजे. आम्ही कितीही उच्च स्थानावर पोहोचलो. मात्र पक्षाशी बेईमानी करणे चुकीचे आहे. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणे रक्तात नाही, असे संजय राऊत म्हणाले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…