

कोल्हापूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदावरून नाराजीनाट्य असल्याच्या चर्चेला उधाण आलं असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्री पद देऊच नये, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण दिला होता असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे भाष्य केले. नाराजी नाट्याच्या घडामोडीवर काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आता सल्ला देण्याची वेळ निघून गेलेली आहे. त्यावेळी मी त्यांना सल्ला दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्री पद देऊच नका, असे मी म्हटले होते. मात्र त्यांनी ऐकले नाही. दुसरा पक्ष खाण्यामध्ये मास्टर आहे. खाल्ले की बाजूला फेकून देतात. हा त्यांचा इतिहास असल्याचे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आजही हे सल्ले ऐकण्याच्या स्थितीत उद्धवजी असतील, असे मला वाटत नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये गृहमंत्री पदावरून नाराजी आसल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. गृहमंत्री उत्तम काम करत आहेत, अशी स्पष्टोक्ती उद्धव ठाकरे यांनी दिली. तर दुसरीकडे स्वत: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्री माझ्यावर कुठल्याही प्रकारे नाराज नसल्याचे सांगितले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…