

नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूरमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सरकारच्या वतीने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सध्याच्या सरकारकडून समाधानकारक काम होत नाही. उलट राज्यात अनेक विषय समोर आले आहेत. सरकारच्या चहापानाला जावे अशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाहीर केले.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आणि प्रमुख नेत्यांची आज अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती दिली. सध्याच्या सरकारकडून समाधानकारक असे निर्णय होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या चहापानाला जावे अशी परिस्थिती राहिलेली नसल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.
राज्यातील समस्या सोडवण्याबाबत या अधिवेशनात दोन्ही बाजूंनी चर्चा व्हायला हवी असे सांगतानाच हे अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली. राज्यात अनेक प्रश्न उभे आहेत. वाचाळवीरांमुळे राज्यातील वातावरण गढूळ झालेले आहे. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. सरकार सातत्याने कर्ज काढण्यावर भर देत आहे. राज्यातील अनेक प्रकल्प पराराज्यात जात आहेत. मात्र तरीही सरकार शांतच असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…