

मुंबई : प्रतिनिधी
येत्या १८ जुलैपासून नियोजित असलेले महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधीमंडळाने याबाबत पत्रक काढून अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली असून अधिवेशन कधी होणार याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही.
संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै २०२२ पासून सुरू होणार होते. मात्र आता हे अधिवेशन लांबणीवर पडले आहे. याबाबत कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे हे अधिवेशन कधी होणार याबद्दलही स्पष्टता नाही.
संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे विधीमंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे सरकारची स्थापना होऊन १५ दिवस उलटल्यानंतरही मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकलण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…