

मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. समता पार्टीने ठाकरे गटाला मिळालेले मशाल चिन्ह आमचे असल्याचे सांगत दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. आज दिल्ली उच्च न्यायालयाने समता पार्टीची याचिका फेटाळली आहे.
शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर शिवसेना कोणाची यावर वाद चालू होते. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव गोठवून शिंदे आणि ठाकरे गटाला नवीन नावे आणि चिन्हे दिली.
ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले. मात्र समता पार्टीने मशाल हे चिन्ह आमचे असल्याचा दावा करत दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. अखेर आज झालेल्या सुनावणीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने समता पार्टीची याचिका फेटाळली.
समता पार्टीचे काही वर्षांपूर्वी विलीनीकरण झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचे मशाल हे चिन्ह गोठवले होते. ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह दिले होते.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…