

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील सत्तासंघर्षावर आता सर्वोच्च न्यायालयात २१ फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात होणारी सुनावणी ही पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढेच होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी घटनापीठाकडे करण्यात आली होती.त्यावर गेल्या तीन दिवसात सुनावणी होवून न्यायालयाने निर्णय जाहीर केला आहे.
आज घटनापीठात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक पानी निकाल जाहीर केला. त्यानुसार २१ व २२ फेब्रुवारी रोजी याबाबत सुनावणी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच नबाम रेबियाचे प्रकरण सात न्यायमूर्तीकडे जाण्यासाठी पात्र नसल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाकडेच राहणार आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…