

मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. अशातच ईडीच्या कारवाईमुळे कारागृहात असलेल्या माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदानाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून या दोघांची याचिका फेटाळण्यात आली आहे.
महाराष्ट्रात विधानपरिषदेसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता.
आज याबाबत निकाल देताना देशमुख आणि मलिक यांच्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. कोणत्याही कैद्याला मतदानाचा अधिकार नाही असा दावा ईडीकडून करण्यात आला होता. ईडीच्या वकिलांनी देशमुख आणि मलिक यांच्या मागणीवर जोरदार आक्षेप नोंदवत कैद्यांच्या हालचाली आणि बोलण्यावर मर्यादा असतील तर त्यांना मतदानाचा अधिकार कसा देता येणार असा प्रश्न उपस्थित केला होता.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे महाविकास आघाडी सरकारपुढील चिंता वाढली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन मते कमी झाल्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…