

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाच राज्यातील निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाच राज्यांतील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागवून घेतले आहेत. त्यानुसार पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश येथील प्रदेशाध्यक्षांनी आपले राजीनामे पाठवले आहेत.
पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील दारूण पराभवानंतर काँग्रेस सध्या ॲक्शन मोडवर आले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसची नवी दिल्ली येथे बैठक पार पडली होती. या पाच राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामा घेण्याचा निर्णय या बैठकीत झाला असल्याची माहिती रणदीप सुरजेवाला यांनी काल दिली होती.
पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू, उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल आणि उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. उर्वरित दोन राज्यांतील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे अद्याप बाकी आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…