

पुणे : प्रतिनिधी
मुळशी तालुक्यातील कासारसाई धरणात बुडून दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. शशांक सिन्हा (वय १९) आणि रवीकुमार विनोद कुमार (वय १९) असे धरणात बुडून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत. दोघेही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते. ते दोघे गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या इतर चार मित्रांसोबत फिरण्यासाठी कासारसाई धरण परिसरात गेले होते.
सगळे मित्र धरणाच्या पाण्याशेजारी उभा होते. यादरम्यान शशांक, रवी कुमार आणि त्यांच्या एक मित्र पाय घसरून पाण्यात पडले. तिघांपैकी शशांक आणि रवी कुमार खोल पाण्यात बुडले. उर्वरित पाण्यात बुडलेल्या एकाला इतर मित्रांना वाचवण्यात यश आले. मित्रांनी शशांक आणि रवीकुमार या दोघांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढले. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला होता.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…