

दौंड : प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी दौंड नगरपरिषदेच्या साठवण तलावात बुडून तीन महाविद्यालयीन युवकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर दौंड शहर विकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत साठवण तलावाच्या सुरक्षिततेबाबत सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
दि. ६ मार्च रोजी दुपारी दौंड शहरातील काही महाविद्यालयीन युवक साठवण तलाव परिसरात फोटो शूटसाठी गेले होते. याच दरम्यान एक युवक पाण्यात बुडू लागला, त्याला वाचवण्यासाठी इतर दोघेही पुढे सरसावले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. आतापर्यंत या तलावात बुडून २५ ते ३० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
साठवण तलावास लागून वन विभागाचे क्षेत्र आहे. हल्ली फोटोशूटसाठी मोठ्या प्रमाणात लोक या परिसरात येत असतात. पोहण्यासाठी मनाई असल्याबाबत कोणताही फलक नगरपरिषदेने या ठिकाणी लावलेला नाही. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक निष्पाप व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर दौंड शहर विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले आहे. या तलावाभोवती कुंपण बांधण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नगरपरिषदेला तलाव परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना राबावण्याबाबत सूचना देण्यात याव्यात असेही या निवेदनात म्हटले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…