

पुणे : प्रतिनिधी
लग्नानंतर मूल होत नसल्याने सासरच्या माणसांकडून फुरसुंगी येथील एका महिलेचा जाच होत होता. या जाचाला कंटाळून त्या महिलेने आपले जीवन संपवले आहे. आसावरी सचिन धुमाळ (वय २८, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत महिलेचा भाऊ रोहन गोविंद पोळ (वय २५, रा.जेजुरी,पुरंदर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
तक्रारीवरुन पोलिसांनी पती सचिन वसंत धुमाळ (वय ३३) सासरे वसंत पांडुरंग धुमाळ (वय ६५) सासु वंदना वसंत धुमाळ (वय ६०), दीर स्वप्नील वसंत धुमाळ (वय २८) आणि जाऊ अंजली स्वप्नील धुमाळ (वय २५, सर्व रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
२०१४ मध्ये आसावरी आणि सचिनचा विवाह झाला होता. परंतु लग्नानंतर या दोघांना मूल होत नव्हते. त्यामुळे सासरच्या लोकांकडून तिचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. तिला तिच्या पती साठी दुसरी मुलगी बघायला घेऊन गेले होते. त्यामुळे तिने या जाचाला कंटाळून २६ मार्च रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेच्या भावाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक थोरात करत आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…