

पुणे : प्रतिनिधी
वाढती वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात याला आळा घालण्यासाठी पुणे महानगर प्राधिकरणाने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम करण्यास सुरुवात केलेली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून खराब झालेल्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात येणार आहे. या दरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळही पुरवले जाणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू असताना वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यासाठीच वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना वाहतूक शाखेकडे सोपवण्यात आले आहे. यामुळे वाहतूक नियंत्रित होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.
वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून गणेशखिंड, बाणेर या ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात या रस्त्यांची पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी पाहणी केली आहे. यानंतर त्यांनी पर्यायी रस्त्याचे बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच पीएमआरडी आणि पुणे मनपा यांच्या प्रकल्प विभागांच्या अधिकाऱ्यांनीही या परिसराची पाहणी केली आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…