

जयपुर : वृत्तसंस्था
राजस्थानमधील चंबळ येथे दुर्दैवी घटना घडली आहे. लग्नाच्या वऱ्हाडातील कार नदीमध्ये कोसळून झालेल्या भीषण अपघातात नवरदेवासह ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री उशीरा नायापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेमुळे लग्न घरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, चौथ का बरवारा भागातून कोटा येथे नवरदेवाच्या वऱ्हाडाची कार आली होती. तेथून परतताना चंबळ येथे एका नदीच्या छोट्या पुलावरून कार नदीत कोसळली. यामध्ये नवरदेवासह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातानंतर स्थानिक आणि पोलिसांनी तात्काळ मदतकार्य केले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त करताना म्हटले, या दुर्दैवी अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली जीवित हानी काळजाला घर पाडणारी आहे. अपघातातील लोकांच्या अकाली जाण्यामुळे अतीव दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रती शोक व्यक्त करतो, अशा शब्दात ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…