

मुंबई : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पंजाब वगळता इतर चारही राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेने पाच राज्यांपैकी उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्याची विधानसभा निवडणूक लढवली. मात्र तिन्ही राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेला त्यांची लायकी कळली असेल, अशी घणाघाती टीका केली आहे.
नितेश राणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून शिवसेनेने महाराष्ट्रात १८ खासदार आणि ५६ आमदार निवडून आणले. जर मोदी यांचा फोटो काढला तर सेनेची काय लायकी आहे हे पाच राज्यांच्या निकालावरून दिसते.
जर शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला त्यांची ताकद आजमावयची असेल, तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे. राजीनामे देवून पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे. तेव्हा तुम्हाला कळेल की उत्तरप्रदेश आणि गोव्यापेक्षाही बिकट परिस्थिती तुमची महाराष्ट्रात होईल, असा टोला नितेश राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लगावला.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…