

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात ५ हजार २९७ पदांसाठीची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच यांची नेमणुक केली जाईल. येत्या काही दिवसांत पोलिसांच्या ७ हजार २३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी दिली.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलातील ७ हजार २३१ पदांची भरती येत्या काळात सुरू करण्यात येईल. पोलीस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या पदाची भरती करताना कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ दिले जाणार नाहीत. ही भरती पारदर्शक पद्धतीने केली जाईल.
पोलीस दल सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सोबतच ब्रिटिश कालीन पोलिस निवासाच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन इमारतींसाठी निधीही उपलब्ध करून दिला जाईल. राज्य राखीव पोलीस दलातील पोलिसांना राज्य पोलिस दलात सामावून घेण्यासाठीची १५ वर्षांची अट शिथिल करून १२ वर्षे करण्यात आलेली आहे. यासोबतच होमगार्ड्स ना १२० ते १५० दिवस काम देण्याचा आणि पोलिस शिपाई पदावर असणार्या पोलिसांना पोलिस उपनिरीक्षक पदावर कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय ही यावेळेस घेण्यात आल्याचे वळसे पाटील यांनी जाहीर केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…