

मुंबई : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना यंदा उन्हाळी सुट्टीपासून मुकावे लागणार आहे. कारण आता उन्हाळ्यातही शाळा सुरू राहणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक परिपत्रक जाहीर केली आहे. त्यानुसार मार्च आणि एप्रिल महिन्यात पूर्णवेळ शाळा सुरू राहणार आहे.
यापूर्वी विद्यार्थ्यांना मार्चमध्ये परीक्षा संपून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळत होत्या. परंतु, आता नव्या परिपत्रकानुसार यंदा संपूर्ण मार्च आणि एप्रिल विद्यार्थ्यांची पूर्णवेळ शाळा असणार आहे. त्याचबरोबर रविवारीही गरज असल्यास शाळा सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
संपूर्ण देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर संसर्ग वाढल्याने शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला, तसतशा शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. परंतु या दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शालेय शिक्षण विभागाने उन्हाळ्यातही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…