

मुंबई : प्रतिनिधी
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना न्यालयाकडून आजही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा ऑर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने २३ मार्चला अटक केली आहे. येत्या २३ एप्रिलला त्यांना अटक होऊन एक महिना पूर्ण होईल. तरी देखील न्यायालयाकडून त्यांना कोणताच दिलासा मिळाला नाही. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्यांना न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे.
येत्या ४ एप्रिलपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. नवाब मलिक यांना पाठीचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयाने कोठडीमध्ये बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु घरच्या जेवणाबाबत अद्याप कोणताही निर्णय न्यायालयाने दिला नाही.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…