

बीड : प्रतिनिधी
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री तथा जिल्हा परिषद सदस्या रेखाताई रविंद्र क्षीरसागर यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
रेखाताई क्षीरसागर यांना आज सायंकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान त्यांचे निधन झाले. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रेखाताईंनी राजुरीच्या सरपंचपदीही कामे केले.
सध्या त्या बीड जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या निधनामुळे बीड शहर आणि जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती रविंद्र क्षीरसागर, मुले संदीप, हेमंत आणि अर्जुन यांच्यासह सुना, नातवंडे असा परिवार आहे.
उद्या राजुरीत अंत्यसंस्कार
रेखाताई क्षीरसागर यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवार दि. २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नवगण राजुरी येथील मळ्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…