

औरंगाबाद : प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह मुलांना वडापावमधून विष दिल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरात घडला आहे. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पतीवर औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली असून संबंधित पतीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. या वादातून त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. त्यातूनच आरोपी इसाक शेख याने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने १६ ऑगस्टच्या रात्री वडापावमध्ये विष कालवून पत्नीसह मुलांना खाण्यासाठी दिले होते.
मात्र उग्र वास येत असल्याने तक्रार महिलेने वडापाव न खाता ते फेकून दिले. त्या वडापावमध्ये काहीतरी मिसळल्याचं लक्षात आल्यानंतर तिने क्रांती चौक पोलिस ठाण्यात धाव घेत पती इसाक शेख याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पती शेख इसाक, नातेवाईक शेख इब्राहीम, शेख युनूस, शेख याकूब, फुरखान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे. पत्नी आणि मुलांच्या जीवावर उठलेल्या पतीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. कौटुंबिक कारणातून थेट हे पाऊल उचलल्यामुळे संबंधित पतीवर कठोर कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…