ममतादीदी जिंकल्या; आता राजकारण संपवून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया : उद्धव ठाकरे

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही निवडणूक विविध मुद्यांमुळे चर्चेत होती. आता या विजयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनोख्या शब्दांत ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. या विजयाचे श्रेय पश्चिम बंगालच्या वाघिणीलाच द्यावे लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. बंगालच्या जनतेला हिंमतबाज आणि ममता बॅनर्जी यांना वाघिणी असे संबोधत त्यांनी अनोख्या पद्धतीने या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. त्याचवेळी आता राजकारण संपले असेल तर सर्वांनी मिळून कोरोना विरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया आशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपला चिमटे काढले आहेत.

 “ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया”,  अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.


ह्याचा प्रसार करा
baramati_adm

Share
Published by
baramati_adm

Recent Posts

BIG BREAKING : शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून निंबूतमध्ये गोळीबार; जखमी रणजीत निंबाळकर सर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, बारामती-फलटणमध्ये खळबळ…!

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…

2 years ago

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; खासदार सुनेत्रा पवार झाल्या विठुरायांच्या भक्तीत तल्लीन..!

पुणे : प्रतिनिधी   जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…

2 years ago

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…

2 years ago

BREAKING NEWS : निंबूतमध्ये ‘सुंदर’च्या व्यवहारावरून झाला गोळीबार; गौतम काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचं कारण काय..?

बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…

2 years ago

BIG NEWS : अजितदादांनी सादर केला ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प; वाचा संपूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर..!

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…

2 years ago

BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यासाठी संस्थांचालकांकडून बायोमेट्रिक हजेरीच्या आदेशाला केराची टोपली; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बायोमेट्रिक हजेरी सुरू होईना..!

बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…

2 years ago