

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाची साखळी तुटावी आणि जनतेला या भयंकर संकटातून दिलासा मिळावा यासाठी राज्यात काल रात्रीपासून १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु संचारबंदीनंतरही नियमांचे पालन होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत आणखी कडक निर्बंध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे लोकल रेल्वे बंद करण्यासह पेट्रोल, डिझेल विक्री बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात कडक लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र त्याला म्हणावा असा नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत आणखी कडक निर्बंध लागू करून कोरोनाची साखळी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राज्य शासनाने संचारबंदी जाहीर करताना काही सवलती दिल्या आहेत. त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मुंबई, पुणे आणि अन्य प्रमुख शहरांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ दिसून आली. किराणा दुकाने, भाजी मंडई येथील गर्दीतही फरक पडलेला नाही. वास्तविक गर्दी कमी करण्याच्या हेतूने सध्या संचारबंदी लागू केलेली आहे. असे असताना नियमांचे उल्लंघन होत असल्याने येत्या दोन दिवसांत कठोर निर्बंध लादले जातील, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…