

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेतील अनिल परब आणि रामदास कदम हे दोन नेते गेल्या अनेक दिवसांपासून आमनेसामने उभे ठाकले आहेत. अशातच आज पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली. कोण शिवसेनेशी एकनिष्ठ आहे आणि कोण गद्दारी करत आहे, हे पक्ष प्रमुखांनी जाणून घ्यावे, असे आवाहनच त्यांनी आज केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मुलाला व त्यांच्या समर्थकांचा सातत्याने छळ होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीची मदत घेतली जात असल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला. शिवसेना सोडण्याच्या प्रश्नावर रामदास कदम म्हणाले, मी अजून निर्णय घेतलेला नाही. मी आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेईन आणि मग निर्णय घेईन.
पुढे काय करणार असे विचारले असता रामदास कदम म्हणाले की, पुढे काय करायचे ते आम्ही ठरवू. अन्याय सहन करण्याची मर्यादा असते. नगरपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मी निर्णय घेईन. पण उद्धवसाहेबांना हात जोडून विनंती आहे की, पक्षात जे काही चालले आहे त्यावर तुम्ही लक्ष द्या.
मागील काही दिवसांपासून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यात वाद सुरू आहेत. रामदास कदम यांनीच भाजप नेत्यांकरवी अनिल परब यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार केल्याचीही चर्चा आहे. अशातच आज रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर तोफ डागली आहे. मला आणि माझ्या मुलाला सातत्याने डावलण्यासाठी अनिल परब करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…