

सांगली : प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावात वाढ होत असल्याने लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यानुसार रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळणार आहे. दरम्यान, निर्बंध शिथिल करण्याबाबत आज संध्याकाळी अध्यादेश निघणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देणार असल्याचे तसेच राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत संकेत दिले होते. आज सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त भागांच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी असेल त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे. जिथे रुग्ण संख्या आटोक्यात नाही, तिथे निर्बंध कायम राहणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. नागरिकांच्या आरोग्याची आपल्याला चिंता असून निर्बंध शिथिल झाले तरी नियम पाळणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना आटोक्यात येत असताना राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करून जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता नियमांचे पालन करून पुन्हा कोरोना वाढणार नाही याची खबरदारी नांगरिकांसह व्यापारी वर्गालाही घ्यावी लागणार आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…