

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील पाच जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समितीच्या रिक्त पदांसाठी होणारी निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लसच्या प्रसाराची भीती असल्यामुळे या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. या निवडणुका रद्द करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारनेही निवडणूक आयोगाला पत्र दिले होते.
राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समितीमधील एकूण ८५ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. त्यामध्ये धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्ह्यात ही निवडणूक पार पडणार होती. मात्र राज्य शासनाने दिलेल्या पत्रानुसार कोरोनाची दुसरी लाट अद्याप कमी झालेली नाही. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा प्लसचा प्रसार होण्याची भीती असल्यामुळे या निवडणुका आहे त्या स्थितीत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१९ जुलै रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान होणार होते. मात्र आता कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन या निवडणुकांबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असेही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…