

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रीमंडळ बैठकीत ही घोषणा केली.
राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज देण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या मदतीची आणि एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये, बागायत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. ही मदत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत केली जाणार आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…